मान उंच, कटी ताठ असावी

 मान  उंच, कटी  ताठ असावी, येण्याने तव सभा सजो

करणी आपली उच्चं असावी, भवतालीची फिकीर नको

अशी काहीशी विडंबनाची, लहान पाणी ची ओळ  आठवते. बहुदा "

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा  सोडू नको
सौंसारा मध्ये ऐस  आपला, उगाच भटकत फिरू नको

ह्या कवितेचे आम्ही केलेले त्यातल्या त्यात  चांगलेसे विडंबन होते. आणि हो ह्याच विडंबनाची दुसरी ओळ बदलून आणखीन भरपूर विडंबने करता येतात ह्याची जाणीव पण आम्हा औटघटकेच्या कवींना होती. ती दुसरी विडंबने जाऊ देत. त्या बद्दल मी परत कधीतरी बोलेन पण हे जे लिहिलेले विडंबन आहे ना ते चांगलेच आठवते. ते जेव्हां शिजवले, तेव्हां पण मला आपण नक्की चांगले कवी होणार असे वाटले होते. आता विडंबन शिजवणे आणि चारोळ्या किंवा कविता  पाडणे हे वाक्प्रचार हे  मी आणि माझ्या बहिणीने मराठी भाषेला बहाल केले दोन अलंकार आहेत. (हा गैरसमज लहान पणा पासून अजून तसाच आहे. आम्ही पुणेरी ना. मग ते असेच असायचे)


पण पुढे जाऊन आपणच लिहिलेल्या ओळींचा सुंदर अर्थ लागू लागला आणि लहान पाणी आपल्या हातून देवानेच इतके चांगले लिहून घेतले असावे असे वाटू लागले. ह्या दोन ओळी कोणा कलाकारा बद्दल च्या आहेत.  कलाकार हा खर्या अर्थाने वल्ली असतो. दोन वेळेच्या जेवणाची सोय झाली कि कलाकाराला कलेशिवाय दुसरे सुचतच नसते. माझे एक स्नेही गायक आहेत. मी त्यांना दबंगराव म्हणतो. चांगला इंजिनियर झालेला हा माणूस जेवण वैगेरे झाले की ह्याला गाणे सुचू लागते. दुसरे एक शिक्षक होते मणेरीकर त्यांचे आडनाव. त्यांना पण इलेक्ट्रिकल च्या लॅब मध्ये प्रोजेक्ट चालला वैगेरे कि गाणे सुचू लागायचे. सगळी पोरे सर्किट च्या भोवती पिंगा घालत असायची आणि हा माणूस एकदम कुठल्यातरी रागाची  तान, अगदी खणखणीत घ्यायचा.  कॉलेज च्या वसती गृहात भेटलेला प्रशांत कडू नावाचा सुहृद मित्र, परीक्षेचा अभ्यास संपल्यावर, पेपर च्या आदल्या दिवशी टेबलाचा तबला आणि डग्गा करून, तबला कुटायचा. त्याच्या बरोबरच तो पी डी शिंदे नावाचा दुसरा नग. हा तबला बडवायचा आणि तो गात सुटायचा.  अर्थात त्यांच्या ह्या अशा कर्मां पायी आमच्यातल्या अनेकांचे पेपर बसायला लागले होते ते वेगळे. तसाच आमचा सचिन नावाचा मित्र. हा कुठेही नाचत सुटायचा. वर्गात किंवा लॅब मध्ये शिक्षकांची पाठ वळली कि हा एकदम नाचायला लागायचा. बरे दिवस असे होते की आम्ही सगळे हळकुंड न लागताच पिवळे पडलेले होतो. एक नग नाचायला लागला कि दुसरा नाचू लागायचा, कि मग तिसरा पण. असे होता होता त्या शिक्षकाला बिचार्याला काळात नसे की असे नेमके काय झाले की निम्मी अर्धी पोरे नाचू लागली.

ही सगळी माझी स्नेहीमंडळी हि कलाकार आहेत. त्यांना ते जे काही करतात त्याचा अभिमान आहे. किंवा आपण वेगळे काहीतरी केले पाहिजे अशी भ्रांत नाही. उंच मान आणि ताठ कमरेने ते त्यांचे जगणे जगात असतात. आणि भोवतालचे माझ्या सारखे पापभीरु, सौंसारकर्मि आणखिन् म्हणाल तर सामान्य चाळकरी मध्यम वर्गीय लोक काय म्हणतील ह्याचा विचार न करता, ते स्वतःची कला जोपासत असतात.

================

चित्रातले कमळ  सुद्धा अगदी तसेच कलाकार आहे. सभोवतालचे वातावरण कसे आहे ह्याचा त्या कमळाला विसर पडलेला आहे. आणि ताठ मानेने ते कमळ दिलखुलास पणे वाऱ्यावर डोलत आहे



=========================
त्यावेळी केले एक विडंबन असेही होते


मान  उंच, कटी  ताठ असावी, अन गालावरती तीळ सजो
मजवरी तिजला प्रेम असावे, भवतालीची फिकीर नको

Comments

Popular posts from this blog

बटाटे पुराण

दत्ता

शिशिर