मान उंच, कटी ताठ असावी
मान उंच, कटी ताठ असावी, येण्याने तव सभा सजो करणी आपली उच्चं असावी, भवतालीची फिकीर नको अशी काहीशी विडंबनाची, लहान पाणी ची ओळ आठवते. बहुदा " बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको सौंसारा मध्ये ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको ह्या कवितेचे आम्ही केलेले त्यातल्या त्यात चांगलेसे विडंबन होते. आणि हो ह्याच विडंबनाची दुसरी ओळ बदलून आणखीन भरपूर विडंबने करता येतात ह्याची जाणीव पण आम्हा औटघटकेच्या कवींना होती. ती दुसरी विडंबने जाऊ देत. त्या बद्दल मी परत कधीतरी बोलेन पण हे जे लिहिलेले विडंबन आहे ना ते चांगलेच आठवते. ते जेव्हां शिजवले, तेव्हां पण मला आपण नक्की चांगले कवी होणार असे वाटले होते. आता विडंबन शिजवणे आणि चारोळ्या किंवा कविता पाडणे हे वाक्प्रचार हे मी आणि माझ्या बहिणीने मराठी भाषेला बहाल केले दोन अलंकार आहेत. (हा गैरसमज लहान पणा पासून अजून तसाच आहे. आम्ही पुणेरी ना. मग ते असेच असायचे) पण पुढे जाऊन आपणच लिहिलेल्या ओळींचा सुंदर अर्थ लागू लागला आणि लहान पाणी आपल्या हातून देवानेच इतके चांगले लिहून घेतले असावे असे वाटू लागले. ह्या दोन ओळी क...